Skip to main content

संच मान्यता 2024 जिल्हा परिषद अमरावती..

शिक्षण हे कोणत्याही समाजाच्या प्रगतीचे माध्यम आहे, जर शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत ढाचा खचायला लागला, तर त्या समाजाचं भवितव्यही ढवळून निघते. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार अमरावती जिल्ह्यात संच मान्यता; एक एप्रिल 2025 पासून लागू झाल्यानंतर अशीच स्थिती निर्माण झाली आहे.  प्राथमिक शिक्षणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राबवलेल्या या योजनेमुळे प्रत्यक्षात शाळा बंद होण्याची वेळ आली आहे, शिक्षक "अतिरिक्त" ठरवले जात आहेत आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात येत आहे.
संच मान्यता म्हणजे जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखालील शाळांचे प्रशासकीय आणि शैक्षणिक पुनर्रचना ते सध्या आधार व्हेरिफाइड करीत आहेत. शिक्षकांची संख्या  विद्यार्थी पटसंख्येप्रमाणे निश्चित केली जाते, ज्यामुळे प्रशासकीय सुलभता,शिक्षकांचे कार्यक्षम नियोजन आणि 
गुणवत्तेच्या दृष्टीने प्रयत्न,(PTR ) हे उद्दिष्ट चांगले असले तरी प्रत्यक्षात संच मान्यता अंमलबजावणी विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या विरोधात जाताना दिसते.
अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत मराठी आणि उर्दू 
शाळा संख्या: 1548
केंद्रशाळा संख्या: 139
आहेत.
संचमान्यता 2023-24 नुसार 
मुख्याध्यापक: 217
शिक्षक UGT: 3924
विषय शिक्षक GT: 1344
एकूण शिक्षक: 5540
संचमान्यता 2024-25 नुसार 
मुख्याध्यापक: 208
शिक्षक UGT: 3785
विषय शिक्षक GT: 985
एकूण शिक्षक: 4988
📌 *तफावत: एकूण - 552*  शिक्षकांची होणार आहे.
वरील आकडेवारी केवळ संख्या न दाखवता,  हजारो विद्यार्थ्यांचा  शिक्षणाचं हक्क हिरावून घेतल्याचं चित्र दिसत आहे.
शाळांमधील शिक्षक संख्या कमी केल्यामुळे अनेक शाळा पूर्णतः किंवा अंशतः बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
विशेषतः लहान शाळा किंवा एक विषय शिक्षक मंजूर असलेल्या शाळा कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 4-5 किमी पायी प्रवास करावा लागेल.
अनेक कुटुंबे खाजगी शाळांकडे वळत आहेत ज्यामुळे शिक्षण खर्चात वाढ होईल.
गरिब कुटुंबातील मुले शाळाबाह्य होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गुणवत्तेचे विषय शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याने शिक्षणात अपूर्णता येईल.
वर्गशिक्षकांच्या अनुपस्थितीत मनापासून शिकवण्याची प्रक्रिया हरवते. सहावी सातवीचे  दोन वर्ग , एक शिक्षक आणि चौदा विषय कस शक्य आहे? म्हणजेच शाळा सुरू असतील पण शिक्षण बंद असेल.
धारणी, चिखलदरा, तालुक्यातील शाळांमध्ये सुद्धा पद कमी झाली आहेत. शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 (RTE), RTE महाराष्ट्र शासन नियमावली 2011 नुसार 6-14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण देणं सरकारचं कर्तव्य आहे. 2002 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीने शिक्षण हा मूलभूत हक्क हरवलेला आहे, तरीही संच मान्यतेमुळे हे सर्व निकष पाळले जात नाहीत, यामुळे  थेट कायद्याचा भंग आहे.
सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या विरोधात जाऊन शाळा उभारल्या.
त्यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली.
आज आपण त्यांच्या क्रांतिकारी शैक्षणिक वारसाला कलंक लावत आहोत का? सुरू असलेल्या शाळा शिक्षकाविना बंद करून!!

Comments

Popular posts from this blog

पटसंख्या घटल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात 35 शिक्षक निलंबित...

पटसंख्या घटल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात ३५ शिक्षक निलंबित . जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे आणि शिक्षकांच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर आढळून आल्यामुळे जिल्हा परिषदेने कठोर निर्णय घेत १० दिवसांत तब्बल ३५ शिक्षकांना निलंबित केले आहे. शिक्षण उपसंचालक गुलाबराव खरत यांनी यासंदर्भातील कार्यवाही करत स्पष्ट केले की, शाळांमधील घटती पटसंख्या, गुणवत्तेतील घसरण आणि जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक बनले होते. ही कारवाई शिक्षण विभागाकडून 'अकार्यक्षम शिक्षक शोध मोहीम' अंतर्गत करण्यात आली असून यात विशेष समित्या नियुक्त करून निरीक्षण व चौकशी केली गेली. निरीक्षणात हे स्पष्ट झाले की अनेक शाळांमध्ये शिक्षक शाळेत उपस्थित राहूनही अध्यापन कार्य करत नाहीत. विद्यार्थ्यांची उपस्थिती खालावली असून इयत्ता ५वी व ८वीच्या मूल्यमापन परीक्षांमध्येही विद्यार्थ्यांचे अत्यंत कमी गुण दिसून आले. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ३५ शिक्षकांची सेवा निलंबित करण्यात आली आहे. यामध्ये मलकापुर, शेगाव, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडर...

संचमान्यता 2024

संचमान्यता 2024 : ग्रामीण शिक्षणावर आलेले संकट. भारताचे संविधान बालकांना शिक्षणाचा मूलभूत हक्क देतो. ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act)’ हे विधिनियम स्पष्टपणे सांगते की, प्रत्येक 6 ते 14 वयोगटातील मुलांना दर्जेदार, सर्वसमावेशक आणि समतामूलक शिक्षण मिळालंच पाहिजे. महाराष्ट्र शासनाने त्यानुसार ‘महाराष्ट्र शिक्षण हक्क नियम, 2011’ तयार करून शिक्षण व्यवस्थेची अंमलबजावणी सुरु केली. त्यात मुलांच्या अंशतः संख्येवरून शाळा बंद करणे, शिक्षक कमी करणे हे अजिबात अपेक्षित नव्हते. याउलट, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) हे अधिक गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि शिकण्यावर आधारित शिक्षणाच्या दिशेने पाऊल टाकणारे धोरण आहे. पण याच्या अगदी विरुद्ध, 1एप्रिल 2025 मध्ये "संचमान्यता 2024" ही शासनाद्वारे निर्धारित करण्यात आली. यात 15 मार्च 2024 चा शासन निर्णय (जी.आर.) निकष म्हणून वापरला गेला. पण या निकषांचा वापर करताना शासनाने शाळेतील वास्तव, ग्रामीण भागातील परिस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्ता याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते. एक शिक्षक 14 ...